मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करणार !

मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करणार !

धुळे: मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेले धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. ते मोबाईल टॉवरवर सकाळपासून चढून बसले असून मागण्या मान्य न झाल्यास टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये पाटील यांनी धर्मा पाटील कुटुंबियांना अद्यापही न्याय मिळाला नाही आणि दोषींवर कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करू, असे म्हटले आहे.

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण राज्यात गाजले होते. त्यांच्या मृत्युला एक वर्षाचा कालावधी होत आला तरी दोषींना शिक्षा झालेली नाही. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देणारे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि चंद्रशेखर बावनकुळे कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. याची जबाबदारी घेऊन तिघांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. ते जर तसे करण्यास असमर्थ असतील तर आपण नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.याकडे दुर्लक्ष झाल्यास मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असेल, असेहीट नरेंद्र पाटील यांनी नमूद केले आहे.

Previous articleडिजीटल प्रचारात धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांपेक्षा आघाडीवर
Next articleदुष्काळाबाबत केंद्र व राज्यसरकार गंभीर नाही- शरद पवार