मुख्यमंत्री तुम्हाला खात सांभाळता येत नसेल तर चालते व्हा

मुख्यमंत्री तुम्हाला खात सांभाळता येत नसेल तर चालते व्हा

नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई :  पोलिस दलातील महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत. त्यांच्या कुटुंबातील लोक सुरक्षित नाहीत. मग राज्यातील महिलांच काय होणार असा सवाल करतानाच मुख्यमंत्री तुम्ही करताय काय, तुम्हाला खात सांभाळता येत नसेल तर चालते व्हा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला.

औरंगाबादमधील महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीवर एका पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नवाब मलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.आज औरंगाबादची घटना समोर आली आहे.पोलीस अधिकारी महिला पोलिसांच्या मुलीवर बलात्कार करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी महिलांचा छळ करत आहेत. त्यांच्या हत्या करुन त्यांचे मृतदेह फेकून देत आहेत. या महाराष्ट्र पोलिस दलात चाललय काय असा संतप्त सवाल  मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना थेट केला आहे.या राज्यातील पोलिस महिला कर्मचारी, अधिकारी, त्यांचं कुटुंब सुरक्षित नाहीत तिथे राज्यातील महिला कशा सुरक्षित राहतील याबाबत राज्यातील जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असून, त्यातून राज्याचे मुख्यमंत्री अकार्यक्षम झालेले आहेत हे सिध्द झाले आहे असा आरोपही  मलिक यांनी मुख्यमंत्र्यावर केला.

Previous articleनाणार प्रकरणी दिशाभूल केल्याने सुभाष देसाईंनी राजीनामा द्यावा
Next articleशिवसेना की भाजपा बाजी मारणार :  निकाल उद्या