मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करा

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करा
-रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पाठविले पत्र
मुंबई : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंत्राटदारांकडून या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यात येत नसल्यामुळे येथील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्ररित्या कंत्राटदारांची नेमणुक करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद न करता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ज्या ठेकेदारांना देण्यात आले आहे, त्यांच्या एकुण कामाच्या मक्त्याच्या रक्कमेतून वळती करावी, अशी सुचना रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. या चौपदरीकरणाचे काम ठेकेदारांना काही अटी व शर्ती वर देण्यात आले आहे. त्यानुसार या कामाचे कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षापर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करावी, असे बंधनकारक आहे. त्यासाठी ठेकेदारांना देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये खड्डे बुजविण्याच्या रक्कमेचा ही समावेश करण्यात आला आहे.
पावसाळ्यापुर्वी या राष्ट्रीय महामार्गावर पडणारे खड्डे बुजविणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. परंतु ठेकेदारांकडून याची गंभिर दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर या महामार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशंाना नाहक त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरील खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून यामुळे अनेक प्रवाशंाना आपले प्राणही गमवावा लागल्याच्या घटनाही घडत आहेत. याप्रश्‍नी जिल्हाधिकारी तसेच संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या समवेत अनेकवेळा बैठका घेऊन संबंधित ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा तसेच या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देेेश देण्यात आले आहेत. परंतु संबंधित अधिकार्‍यांनी एकाही ठेकेदाराविरोधात कुठलीही कारवाई केली नाही. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक तो निधी चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराला दिल्यानंतरही खड्डे बुजविले जात नसल्याने प्रशासनाच्या विरोधात जनतेमध्ये तसेच प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्डयांप्रश्‍नी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत प्रश्‍नही उपस्थित केले आहेत. स्थानिकांकडून तक्रारीही प्राप्त होत असल्याचे वायकर यांनी पाठविलेल्या पत्रान नमुद केले आहेत.
त्यामुळे यापुढे महामार्गावर पडलेले खड्डे विहीत वेळेत भरण्यासाठी स्वतंत्ररित्या ठेकेदारांची नेमणुक करण्यात यावी. या कामासाठी येणार स्वतंत्ररित्या निधीची तरतूद न करता चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराच्या रक्कमेतून वळती करण्यात यावी, अशी सुचनाही वायकर यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.
Previous articleपंकजा मुंडे यांनी प्रचार केलेल्या सर्वच्या सर्व १४ जागा भाजपने जिंकल्या
Next articleशासकीय अधिकारी आणि कर्मचा-यांना जानेवारी पासून वेतनलाभ