मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास आंदोलन मागे !

मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास आंदोलन मागे !

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचे स्वागत करतानाच हे आश्वासन लेखी स्वरूपात द्यावे नंतरच आंदोलन मागे घेण्यावर निर्णय घेवू, तो पर्यंत आंदोलन चालूच राहील अशी भूमिका परळी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे नेते आबासाहेब पाटील मांडली आहे.

मराठा आरक्षणावर येत्या नोव्हेंबर पर्यंत कार्यवाही पूर्ण करू तसेच राज्यात होणारी मेगा भरती थांबवत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.मेगा भरती प्रक्रिया स्थगिती केल्याची सकारात्मक घोषणा मुख्यमंत्र्यांनो केली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलनाचे नेते आबासाहेब पाटील दिली आहे. याबाबत प्रशासना कडून लेखी येण्याची अपेक्षा असून,प्रशासनाचे लेखी पत्र आल्याशिवाय,आंदोलन स्थगित होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमराठा आरक्षणापर्यंत मेगा भरतीला स्थगिती : मुख्यमंत्री
Next articleएकनाथ शिंदेंकडे चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी