…तर राजकारण सोडेन : एकनाथ खडसेंचा इशारा

…तर राजकारण सोडेन : एकनाथ खडसेंचा इशारा

जळगाव : जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन, असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.तर राज्यात भाजपचे सरकार आणण्याचे सर्व श्रेय खडसे यांनाच जात असल्याने त्यांच्यावरील दूर करण्यासाठी पक्ष श्रेष्ठींशी बोलणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाराज खडसे यांनी महसूलमंत्री पाटील यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त करीत वरील इशारा दिला. राज्यात भाजपचे सरकार आले त्याचे संपूर्ण श्रेय हे खडसे यांचे असून,त्यांच्यावरील अन्याय लवकरच दूर होईल अस आपल्या भाषणात सांगतले. त्यावर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन असा इशारा खडसे यांनी दिला. त्यांनी आपल्या भाषणात दिवार या चित्रपटातील संवाद सांगून, माझ्या मागे जनता आहे. परंतु आपण आपण क्लीन चीट आहोत, हे मान्य करायला सरकार तयार नाही. यामुळे दोषी नसल्याचे पटवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Previous articleआगामी निवडणुकीत भाजप सरकारची हंडी जनता फोडणार
Next articleकोट्यवधी पाण्यात..मंत्रालयाच्या पायऱ्या तोडणार !