अहिंसेच्या दिवशी भाजप सरकारचा हिंसक चेहरा समोर आला :नवाब मलिक

अहिंसेच्या दिवशी भाजप सरकारचा हिंसक चेहरा समोर आला :नवाब मलिक

मुंबई : अहिंसेचे भान न ठेवता किसान क्रांती पदयात्रेतील शेतकऱ्यांवर बळाचा वापर करीत लाठीहल्ला करणाऱ्या भाजप सरकारचा हिंसक चेहरा समोर आला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

 दिल्लीत विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुरांच्या नळकांडया फोडत लाठीहल्ला करण्यात आला. गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेचे भान न ठेवता हे कृत्य करण्यात आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करत असून या शेतकऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असल्याची माहितीही  मलिक यांनी दिली.

मोदी सरकार ‘मर जवान,मर किसान’म्हणत होते आता त्यांची मानसिकता अधिक प्रखरपणे या घटनेतून स्पष्ट झाली आहे अशी टीका  मलिक यांनी केली आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांना पहिला धक्का.. आशिष देशमुखांचा आमदारकीचा राजीनामा
Next article“बापु”जीने के लिए ये लोग तो हानीकारक हैं : मुंडे