आ.तुकाराम कातेंवरील हल्ला ठेकेदारीतून : नवाब मलिक

आ.तुकाराम कातेंवरील हल्ला ठेकेदारीतून : नवाब मलिक

मुंबई : शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेला हल्ला हा ठेकेदारीतून झाला असून याला शिवसेनेतील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर काल रात्री तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. मानखुर्द येथिल महाराष्ट्र नगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. येथे मेट्रो कारशेड उभारणीचे काम रात्रदिवस सुरु असल्याने याचा तेथील स्थानिकांना त्रास होत असल्याने हे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी आ.काते यांनी या विरोधात आंदोलन केले होते.या हल्ल्यातून आ. तुकाराम काते बचावले असून,त्यांच्या सुरक्षारक्षकासह दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. आता या हल्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.आ.कातेंवरील हल्ला हा ठेकेदारीतून झाला असून, याला शिवसेनेतील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असतानाही मुंबईत गँगवार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का? असा सवालही मलिक यांनी केला आहे.

 

Previous articleतावडे साहेब..राज्यातील जनतेची माफी मागा: मुंडे
Next articleमहात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा