ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील
मुंबई : गेल्या साडेचार वर्षातील सर्व निवडणुकांचा आलेख पाहता आगामी निवडणूका भाजप-शिवसेनेने एकत्ररित्या लढविल्यास राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहणार नाही असा दावा करतानाच शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी एकत्र यावे असे जाहीर आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले .ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असेल असे पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजप शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात आहे मात्र शिवसेना सतत विरोधात बोलत असते अशी नाराजी पाटील यांनी व्यक्त केली. युतीसाठी बाजप हतबल झाली नसून, ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री असेल असे पाटील यांनी सांगून, शिवसेना भाजपाने आगामी निवडणूका एकत्रित लढवाव्यात असे आवाहन केले. गेल्या साडेचार वर्षात भाजप शिवसेना अनेक निवडणूक स्वतंत्रपणे लढले असली तरी आमच्या दोघांच्याही जागा वाढल्या आहेत लोकसभेच्या ४२ जागा तर विधानसभेच्या १८३ जागा भाजप शिवसेनेकडे आहेत युतीची चर्चा झाल्यास उर्वरित ६ जागांची चर्चा क्षणामध्ये होवू शकतात असे पाटील यांनी सांगितले. मानसिकता झाल्यास जागा वाटप लगेच होवू शकते असे पाटील यांनी सांगून स्वबळाचा नारा देणा-या शिवसेनेने गेल्या १५ वर्षातील कॅांग्रेसचा कार्यकाल चांगला होता असा दावा करणार का असा सवाल पाटील यांनी करून खा. राजू शेट्टी आणि शिवसेना कॅांग्रेसला पोषक वातावरण तयार करीत असल्याची टीका केली.
आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल या शिवसेनेच्या वक्तव्याबाबत बोलताना पाटील म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांनी सांगितलेला कोणीही ठरवू शकतो मात्र त्यासाठी भाजप सेनेने एकत्रित यावे हि राज्यातील जनतेची इच्छा आहे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात येऊ नये त्यासाठी एकत्र निवडणूक लढवणे गरजेचे आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा करता येईल असे पाटील यांनी स्पष्ट केले. कॅांग्रेस राष्ट्रवादीवर टीका करताना पाटील म्हणाले की, हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आगामी मुख्यमंत्री हा कॅांग्रेस राष्ट्रवादीचा नसेल तर युतीचाच असेल असा दावाही त्यांनी केली.
दुष्काळावरून पाटील यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली.विरोधक हे खालच्या पातळीवर घसले असून,काल झालेल्या शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेत घातपात होता असा आरोप करणा-या अशोक चव्हाण यांचाही समाचार पाटील यांनी घेतला. शिवस्मारकाचे काम तुमच्या हातुन व्हावे असे वाटत होते तर विखे यांनी त्याच्या कार्यकाळात ते का केले नाही असा सवालही पाटील यांनी केला. विरोधी पक्ष दुष्काळावरून राजकारण करीत असल्याची टीका पाटील यांनी करीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार गंभीर झाल्याने विरोधक सैरभैर झाले आहे अशी टीका पाटील यांनी केली.