बिर्ला आणि अंबानीच्या फायद्यासाठी अवनीची हत्या:जयंत पाटील

बिर्ला आणि अंबानीच्या फायद्यासाठी अवनीची हत्या:जयंत पाटील

मुंबई:अवनी या नरभक्षक वाघिणीच्या शिकारीवरुन राजकीय रणकंदन सुरु झाले आहे. या राजकीय आरोप प्रत्यारोपांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतली आहे. उद्योगपती अंबानी आणि बिर्ला यांना फायदा करुन देण्यासाठीच अवनीची शिकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

पाटील म्हणाले की, वन्य प्राणी कायद्यानुसार एखादा प्राणी हिंसक बनला तर त्याला बेशुद्घ केले जावे, असा नियम आहे. पण अवनीच्या बाबतीत सारे नियम पायदळी तुडवले. हे निषेधार्ह आहे. उद्योगपतींच्या लाभासाठी अवनीची शिकार करण्यात आली. याचा जाब आम्ही विचारणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. वन खात्याला चोरटी जंगलतोड दिसत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Previous articleजयंत सावरकर व विनायक थोरात यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Next articleमुख्यमंत्री करणार दुष्काळी भागांचा दौरा