अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीची पुनर्रचना

अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीची पुनर्रचना

मुंबई : अवनी अर्थात टी-१ वाघिण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वनमंत्री प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एस.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती. आज या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. बंगलोरचे संचालक डॉ. उल्हास कारंथ यांची समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीचे तांत्रिकदृष्ट्या बळकटीकरण होण्यासाठी वन्यजीव क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ आणि सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज, बंगलोरचे संचालक डॉ. उल्हास कारंथ यांची समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादून चे संशोधक डॉ. पराग निगम यांची सदस्य म्हणून या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. आता ही समिती सहा तज्ज्ञांची असून यामध्ये वरील अध्यक्ष, सह अध्यक्ष आणि सदस्यांशिवाय डॉ. अनिश अंधेरिया- अध्यक्ष वाईल्ड लाईफ कन्झरवेशन, मुंबई, भारतीय वन्यजीव संस्थान देहरादूनचे डॉ. बिलाल हबीब यांचा सदस्य म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश आहे.
ही समिती टी-१ वाघिणीच्या मृत्यूप्रकरणात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गतच्या तरतूदी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले आहे किंवा कसे, याची खातरजमा व तपासणी करील.

Previous articleतीन वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
Next articleराज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा?: विखे पाटील