शिवसेना रामाच्या चरणी मंत्र्यांचे राजीनामे वाहणार का? :जयंत पाटील

शिवसेना रामाच्या चरणी मंत्र्यांचे राजीनामे वाहणार का? :जयंत पाटील

मुंबई: अयोध्येच्या दौऱ्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे निघाले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. राजीनामे खिशात असल्याचे वक्तव्य ठाकरेंनी केले होते. त्यावर शिवसेना आपल्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे रामाच्या चरणी वाहणार का? असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार असा नारा आता शिवसेनेने दिला आहे. पण शिवसेनेची ही घोषणा म्हणजे भाजपसोबत युती करण्याचा मार्ग आहे, असे पाटील म्हणाले.केंद्र आणि राज्यातही भाजप सरकार असताना पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. सध्या शिवसेना भाजपसोबत असली तरी भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरू असतो, असेही पाटील यांनी सांगितले.

Previous articleसत्तेतील कुंभकर्णामुळे मंदिर झाले नाही : उध्दव ठाकरे
Next articleआता हिंदू स्वस्थ बसणार नाही बोला मंदिर कधी उभारणार !