आनंदाची बातमी : मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी
मुंबई : विधिमंडळात चर्चेविना एकमताने मंजूर झालेल्या मराठा आरक्षण विधेयकावर आज राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी स्वाक्षरी केली आहे.त्यामुळे आता राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्त्वात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द यामुळे खरा ठरला असून,मराठा समाजाने काल आणि आज जल्लोष साजरा केला.
आता आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन खरे ठरले आहे. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने मराठा आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.मराठा समजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील वधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चेविना मंजूर झाले. मराठा समाजासाठी आणि राज्यातील युती सरकारसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आले होते. राज्यपालांनी यावर स्वाक्षरी केल्याने मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्त्वात आला आहे.