राज ठाकरे यांच्या दंगलीबाबतच्या आरोपाला खा. संजय राऊत यांनी काय उत्तर दिले ?

राज ठाकरे यांच्या दंगलीबाबतच्या आरोपाला खा. संजय राऊत यांनी काय उत्तर दिले ?

मुंबई: देशात राम मंदिराच्या नावावर दंगे घडवण्याचा भाजप सेना सरकारचा डाव आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर राज ठाकरे यांच्याकडे दंगलीबाबत माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे, असा उपरोधिक सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांना दिला आहे.

राऊत म्हणाले की, राम मंदिरावरून आता देशात कुठेही दंगली होणार नाहीत. याबाबत कुणाकडे काही माहिती असेल तर पोलिसांना कळवले पाहिजे.राम मंदिराच्या मुद्यावरून असदुद्दीन ओवेसीसारख्यांना हाताशी धरून जातीय दंगली घडवण्याचा डाव रचला आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी विक्रोळीत केला होता. मंदिरा वरून आता दंगल होणार नाही कारण हा प्रश्न आता मंदिरापुरताच उरला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजप आणि एमआयएम एकच आहेत, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनीही करून राज ठाकरे यांना पाठिंबाच दिला आहे. राज ठाकरे यांनी म्हटले होते की, सरकारने साडेचार वर्षात काहीच, विकासकामे केली नाहीत. त्यामुळे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करून देशात दंगली घडवल्या जाणार आहेत. त्यासाठी ओवेसीशी बोलणी सुरू आहेत.निवडणूक जवळ येत असताना राम मंदिर आणि त्यावर आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच पेटणार आहे, हे मात्र स्पष्ट झाले आहे.

Previous articleचिंतामणीचे दर्शन घेवून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरूवात    
Next articleराज्यातील युती सरकार हे सर्वात मोठे विघ्न : चव्हाण