अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरेंकडून माझ्या नावाचा वापर:ओवेसी
मुंबई:भाजप सरकारने एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याशी संगनमत करून जातीय दंगली घडवण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला ओवेसी यांनी उत्तर दिले आहे. राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझे नाव वापरत आहेत, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांची मनसे उत्तर भारतीयांना मारहाण का करते? असा सवाल ओवेसी यांनी केला. माझे नाव घेतल्यामुळे ते राजकारणात त्यांना बळ मिळत असेल तर चांगलेच आहे. त्यांना वाटते की, ओवेसी ही एक गोळी आहे. ओवेसीचे नाव घेतले तर बळ येईल, तर घ्या माझे नाव, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्या विधानावर राजकीय पडसाद उमटत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यीकडे इतकी माहिती असेल तर त्यांनी पेलिसांना कळवावे, असे म्हटले होते. त्याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांसह सीबीआय वगैरे सर्वच यंत्रणा सरकारच्या ताब्यात आहेत. कळवून काय उपयोग होणार, असे उत्तर दिले आहे.तिकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबु असिम आझमी यांनीही नगरमध्ये बोलताना आज भाजप आणि एमआयएम यांची नुरा कुस्ती आहे, असे म्हटले आहे. एमआयएमच्या भाषणाचे स्क्रिप्टही भाजपकडून येते, असा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून उठलेले वादळ।आता लवकर शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.