नारायण राणेंची शेवटची फडफड सुरू : रामदास कदम

नारायण राणेंची शेवटची फडफड सुरू :रामदास कदम

पंढरपूर: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पुन्हा हल्ला चढवला आहे. राणे यांची शेवटची फडफड सुरू आहे. राणे पितापुत्रांना मातोश्रीवर टीका करण्याची जुनी खोड आहे, असे कदम म्हणाले.

कदम यांनी राणे यांच्यावर कडक टीका केली. राणे हे गद्दार आहेत. शिवसेनेने त्यांना मोठे केले. परंतु राणे ते विसरले. आता त्यांची शेवटची फडफड सुरू आहे, असे कदम म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २४ डिसेंबरला पंढरपूर येथे सभा होत आहे. त्याच्या तयारीसाठी कदम आले होते. राज्यातील नद्यांच्या शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम पर्यावरण विभागाने हाती घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या विविध परवानग्या मिळवण्यात येतील.चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि वारकऱ्यांना सोयी पुरवण्यासाठी निधी केव्हाच कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. नदीचे प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

कदम आणि राणे पितापुत्र यांच्यात काहीदिवसांपासून शाब्दिक युद्ध जोरदार रंगले आहे. कदम यांनी राणे हे कोकणावरील काळा डाग असून हा डाग धुतल्याशिवाय मी राहणार नाही, असा हल्ला चढवला होता. त्यास नितेश राणे यांनी तितकेच जोरदार उत्तर देताना कदम हे उद्धव ठाकरे यांनी पाळलेला कुत्रा आहे, असे म्हटले होते.

Previous articleस्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूखंड भाडेकराराचे नोंदणी व मुद्रांक शुल्क माफ
Next articleआदिवासी दुर्गम भागात पोहचणारे राज ठाकरे ठरले पहिले नेते