नगरपरिषदा-नगरपंचायती मधिल १४१६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार

नगरपरिषदा-नगरपंचायती मधिल १४१६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार

 मुंबई : राज्यातील विविध नगरपरिषदा-नगरपंचायतींमध्ये ११ मार्च १९९३ ते २७ मार्च २००९ या कालावधीतील नियुक्त व कार्यरत १४१६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार असून, त्यासोबत अधिसंख्य अस्थायी पदे निर्माण करण्यास  आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) पुढील प्रमाणे

१) राज्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ.

२) नागपूर परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ या उन्नत मेट्रो मार्गास मान्यता.

३) जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (SMART) अंमलबजावणी करण्यास तत्त्वत: मान्यता. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार.

४) राज्यातील विविध नगरपरिषदा-नगरपंचायतींमध्ये ११ मार्च १९९३ ते २७ मार्च २००९ या कालावधीतील नियुक्त व कार्यरत १४१६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार.  त्यासोबत अधिसंख्य अस्थायी पदे निर्माण करण्यास मान्यता.

५) बीड जिल्ह्याच्या परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ महाविद्यालयातील संगणकशास्त्र व शारीरिक शिक्षण या विषयांस अनुदान मंजूर. ६) नागपूर विकास योजनेतील बोरगाव खसरा येथील क्रीडांगणाचे नामाभिधान वगळून संबंधित जागा रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यास मान्यता

Previous articleफडणवीस सरकारचा असहिष्णु चेहरा पुन्हा एकदा उघड : अशोक चव्हाण
Next articleकेंद्र आणि राज्य सरकारचा पराभव निश्चित:छगन भुजबळ