छप्पन इंच छातीवाल्यांची पोटेही छप्पन इंचाची झाली
मुंबई नगरी टीम
मुंबई : पोटाला चिमटा घेवून ज्या मुलांना आपण शिकवले, त्या मुलांना पकोडे तळण्याचा सल्ला देणा-या मोदी आणि फडणवीस सरकारला आता या निवडणुकीनंतर पकोडे तळायला पाठवा अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ चेंबूरच्या लालडोंगर परिसरात घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लक्ष्य करीत त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.पाच वर्षापूर्वी सत्तेवर येताना भाजपाने सर्वसामान्य जनतेला वारेमाप आश्वासने दिली. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचा वादा मोदींनी केला होता. या हिशोबामुळे गेल्या पाच वर्षात दहा कोटी रोजगार उपलब्ध होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र नोटाबंदीमुळे अनेक रोजगार गेल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
या सरकारने लोकांच्या भावनांचे राजकारण केले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करून हे सरकार सत्तेत आले आणि प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षात आंबेडकर असो की शिवस्मारक या दोन्ही स्मारकापैकी एका स्मारकाची साधी वीट हे सरकार रचू शकले नाही. एवढेच नव्हे तर या देशाची लोकशाही च्या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर टीकून आहे, त्या संविधानाची प्रत जाळणारे आजगी या सरकारच्या काळात उजळ माथ्याने फिरत आहेत अशी टीकाही त्यांनी करून संविधानाचा मान राखणा-या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद द्या असे आवाहन करतानाच आघाडीचे सरकार सत्तेवर आले तरच या देशातील लोकशाही टीकेल असे चव्हाण म्हणाले.