भाजपच्या ८ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

भाजपच्या ८ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या आठ बंडखोर उमेदवारांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार या बंडखोरांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणा-या दहा भाजप नेत्यांची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.उरण मधून बंडखोरी केलेले महेश बालदी, पाचोरा येथील अमोल शिंदे,खेड आळंदीतून अतुल देशमुख, दिग्रस मधिल बंडखोर संजय देशमुख, चिमूर मधून बंडखोरी केलेले धनराज मुंगले राजकुमार नाचणे ,(मुर्तिजापूर),कन्नड मधून बंडखोरी केलेले किशोर पवार, कन्नड आणि किनगाव लातूर मधून बंडखोरी केलेले अयोध्या अशोक केंद्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Previous articleपंकजा मुंडे यांना संभाजी सेनेचा बिनशर्त पाठिंबा !
Next articleशेतक-यांच्या आत्महत्या हे भाजपच्या हातात सत्ता असल्याचे परिणाम