पाचव्या दिवशीही खातेवाटपाचा तिढा कायम

पाचव्या दिवशीही खातेवाटपाचा तिढा कायम

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होवून पाच दिवसांचा कालावधी उलटूनही अजून खातेवाटपाला मुहूर्त मिळाला नाही. महत्वाच्या ग्रामिण भागांशी निगडीत खात्यांसाठी काँग्रेस आग्रही असल्याने आजही खातेवाटपाचा तिढा कायम असल्याने मंत्र्यांमध्येही नाराजीची भावना आहे.तर खातेवाटपाचा तिढा सोडविण्यासाठी काही नवी खाती निर्माण करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे.

राज्यातील ठाकरे सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्यातील सहा मंत्र्यांचे खातेवाटप करण्यासाठी आठवड्याचा कालावधी लावल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी तब्बल महिन्याभराची प्रतिक्षा करावी लागली. गेल्या सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होवून ३६ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विस्तारानंतर दोन दिवसात खातेवाटप केले जाईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र मलाईदार खात्यांसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अडून बसल्याने खातेवाटप लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.खातेवाटप आज जाहीर केले जाण्याची शक्यता होती मात्र आज पाचव्या दिवशीही खातेवाटपाचा तिढा कायम आहे.काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी ग्रामिण बागासी निगडीत असलेले कृषी आणि ग्रामविकास यापैकी एक खाते काँग्रेसकडे रहावे असे आपल्या नेत्यांना सांगितल्यामुळे खाते वाटपाचा तिढा वाढला आहे.

आज खातेवाटप जाहीर केले जाण्याची शक्यता होती. मात्र आता खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता ठाकरे सरकारने काही नवी खाती निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यानुसार नव्या खात्यामध्ये मेट्रो मंत्रालय,वाणिज्य मंत्रालय, तिर्थ क्षेत्र विकास मंत्रालय आणि मुख्यमंत्री मंत्रालय या चार नव्या खात्याचा समावेश असून, या खात्यांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे मंत्र्यांना खाती वाटप करताना या खात्यांचा देखील समावेश करणार असल्याचे समजते.

Previous articleसलग दुस-या दिवशी मंत्री उदय सामंतांनी घेतला कामांचा आढावा
Next articleखूशखबर : राज्य शासकीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ