कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसाची मुदतवाढ
१५ नोव्हेंबर पर्यंत वीज खंडित होणार नाही
मुंबई दि.१ मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज बिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतक-यांची १५ नोव्हेंबर पर्यंत वीज खंडीत होणार नाही.
३० ऑक्टोबरला थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता १५ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल १५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल.
१५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांने वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही. तसेच मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहे.ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांचे दंड व्याज माफ होणार आहे.