मनसे आरपीआय’ हा एकच प्रयोग शिल्लक !

मनसे आरपीआय’ हा एकच प्रयोग शिल्लक !

आठवले यांचे मिश्किल विधान

मुंबई दि.२३  मनसे आणि आरपीआयच्या प्रचार सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, मात्र त्याचे रूपांतर मतांमध्ये होत नाही. त्यामुळे आता मनसे आणि आरपीआय हा एकच प्रयोग शिल्लक राहिला आहे.’ असे मिश्किल विधान रिपाइंचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले आहे.

केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्रींचे गेल्या काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यामुळे काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें आणि बाळा नांदगावकर यांनी रामदास आठवलेंच्या वांद्रे येथिल संविधान बंगल्यावर जावून सांत्वनपर भेट घेतली.राजकीय पक्षाचे विचार वेगळे असले तरी एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होण्याची महाराष्ट्राची परंपरा असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.

Previous articleवसंतराव डावखरेंची प्रकृती गंभीर पण स्थिर
Next articleमुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरूवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here