सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसेचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसेचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय विरोधासाठी हिंसेचा वापर करित आहे हे चुकीचे असून’ सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसे कार्यकर्ते मुंबई शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करित आहेत असा आरोप करीत या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करुन कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. मनसेची संस्कृती गुंडगिरीची आहे. लोकशाहीत कायदे व नियमांचे पालन करीत परस्परांच्या मतांचा आदर केला पाहिजे, परंतु मनसेचे कार्यकर्ते ज्या पध्दतीने कायदा हातात घेऊन मुंबईत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत ते निषेधार्ह आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी तोडफोड करून अनेक लोकांना मारहाण केली. काँग्रेस पक्षाने मनसेच्या या दादागिरीचा विरोध केला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी त्याच्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पाठीशी घातल्याने त्यांचे मनोबल वाढले असून राजकीय विरोधकांच्या कार्यालयावर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

राजकारणात वैचारिक मतभेद असतात पण त्यांचा मुकाबला विचाराने करायचा असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय विरोधासाठी हिंसेचा वापर करित आहे हे चुकीचे आहे. सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसे कार्यकर्ते मुंबई शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करित आहेत. हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करुन कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

Previous article…आणि सुप्रिया सुळेंनी त्या ” छकूलीला धीर दिला
Next articleमुख्यमंत्र्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे काही दिसत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here