नियमांचे उल्लंघन केल्यानेच महाबळेश्वर मधिल हाॅटेलवर कारवाई

नियमांचे उल्लंघन केल्यानेच महाबळेश्वर मधिल हाॅटेलवर कारवाई

मुंबई : महाबळेश्वर मधिल हॉटेलवर झालेल्या कारवाईचा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कसलाही संबंध नसल्याचा दावा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज केला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिका-यांनी महाबळेश्वर मधील संबंधित हॉटेलची पाहणी केली असता त्या ठिकाणी सांडपाणी नगरपालिकेच्या लाईनमध्ये प्रक्रिया न करता सोडले जात असल्याचे आढळून आले. त्याच प्रमाणे संबंधित हाॅटेल मध्ये निर्माण होणा-या कच-यावर कसलीही प्रक्रिया केली जात नव्हती. या हाॅटेल मधिल एकूण २७ खोल्या या अनधिकृत असल्याच्या आढळल्या आहेत. म्हणून आठ दिवसांची नोटीस देऊन नंतरच कारवाई केली असल्याचे पर्यावरणमंत्री कदम यांनी सांगितले आहे.या नियमानुसार महाबळेश्वर मधिल हाॅटेलवर कारवाई केली असून, लोणावळामध्ये एकूण १६ हॉटेल बंद केली आहेत, तर मुंबईतील ३० मोठ्या हॉटेलची तपासणी सुरू असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. येत्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ५५ – ६५ डेसीबल मर्यादेच्या आवाजाला परवानगी असल्यामुळे डिजेला परवानगी नाही असे स्पष्ट करतानाच या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असेही पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले.

Previous articleआता भाजपात कोणालाही मुक्त प्रवेश !
Next articleउध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एकमत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here