राष्ट्रवादीच्या लावालाव्या करणाऱ्या वृत्तीमुळे जनतेने घरी बसवले

राष्ट्रवादीच्या लावालाव्या करणाऱ्या वृत्तीमुळे जनतेने घरी बसवले

शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे यांचा नवाब मलिक यांच्यावर पलटवार

मुंबई : राष्ट्रवादीच्या लावालाव्या करण्याच्या उद्योगांमुळेच शरद पवार आणि त्यांच्या पिलावळीला जनतेने वळवळ करू न देता घरी बसवले आहे. अशा शब्दात शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे यांनी नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एकमत नाही असा बालिश आरोप करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची जेवढी किव करावी तेवढी कमीच आहे , यांना तर अजून आदित्य ठाकरेंच्या व्हिजनमध्ये असलेल नाइट लाइफ नेमकं काय आहे ते देखील कळलेले नाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना जे नाइट लाइफ अपेक्षित आहे
ते नाइट लाइफ आदित्य यांच्या खिजगणतीतही नाही त्यांना सर्वसामान्य माणसाला रात्री बेरात्री सुद्धा खाण्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात ही अपेक्षा आहे , आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून रात्री बेरात्री धिंगाणा करणा-या आणि डीजेचा आवाज वाढवून आपल्या श्रीमंतीचा देखावा करणाऱ्यांना विरोध झाला आहे, उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेले ध्वनी प्रदूषण हे गिरी क्षेत्रात होणाऱ्या धांगडधिंगाण्याच आहे या दोन गोष्टींमधला फरकच नवाब मालिकांना कळत नाही, अर्थात त्यांना तो कळणारही नाही कारण तेवढा त्यांचा वकूबही नाही. राष्ट्रवादीबद्दल अधिक न बोललेलंच बरं कारण राष्ट्रवादीच्या अशा लावालाव्या करण्याच्या उद्योगांमुळेच शरद पवार आणि त्यांच्या पिलावळीला जनतेने वळवळ करू न देता घरी बसवलं आहे. नवाब मलिक यांना एवढंच सांगणं आहे असा पलटवार शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे.दुसऱ्याच्या विषयांमध्ये नाक खुपसून त्यांच्यात लावालाव्या करण्यापेक्षा स्वतःची बिकट झालेली अवस्था कशी सुधारता येईल ते पाहा.” अशी खरमरीत प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता डॉक्टर प्राध्यापक मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleमंत्र्यांच्या दौ-यांची माहिती मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना कळवावी लागणार
Next articleग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८२ टक्के मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here