खा. राजू शेट्टी यांचे तिस-या आघाडीचे संकेत !

खा. राजू शेट्टी यांचे तिस-या आघाडीचे संकेत !

नागपूर : काँग्रेस- राष्ट्रवादी काॅग्रेसच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढा देवून या दोन्ही पक्षांना खाली खेचण्यासाठी भाजपाची साथ दिली. मात्र, भाजप पक्षही तसाच निघाला अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी येथे केली.

गेली १५ वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादी काॅग्रेसच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढा देत त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाची साथ दिली. पण भाजप पक्षही तसाच निघाला अशी टिका खा. शेट्टी यांनी करीत त्यामुळेच तिस-या आघाडीसारखी एखादी महाआघाडी उदयास आली तर तिच्या सोबत जाण्याचा विचार केला जाईल असे स्पष्ट केले. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी विविध पक्षांना सोबत घेऊन रिडालोसची मोट बांधली होती. त्यामध्ये आपला सिंहाचा वाटा असे सांगत खा. शेट्टी यांनी तिस-या आघाडीचे संकेत दिले. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपामधील नेते नाराजीचा सूर आवळू लागले आहेत. शेतकरी, विदर्भ अशा प्रश्नांवर ठाम भूमिका घेणा-या नेत्यांना एकत्र करीत तिसरी आघाडी उभारण्याचे संकेत खा. राजू शेट्टी यांनी आज येथे दिले. यासाठी आपण पुढाकार घेतला तर कुणाला आवडेल, न आवडेल. त्यामुळे कुणी पुढाकार घेतला तर आपण त्यासाठी मदत करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८२ टक्के मतदान
Next articleमी दुस-या कोणत्याही पक्षात जाणार नाही : खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here