सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलारांकडून बिनबुडाचे आरोप

सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलारांकडून बिनबुडाचे आरोप

खा. अशोक चव्हाण

मुंबई :  कमला मिल दुर्घटनेला सरकार आणि मुंबई महापालिकेचे भ्रष्ट प्रशासन जबाबदार असून सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

आयटी पार्कला सवलती देण्याचे शासनाचे धोरण होते. या सवलतींचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे. एफएसआयचा गैरवापर होत होता तर, मुंबई महापालिका व राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात कारवाई का केली नाही ? असा प्रश्न खा. चव्हाण यांनी केला.महापालिका आणि सरकारमधील लोकांनी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातल्यामुळेच ही दुर्घटना घडली असून याला राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी भाजप नेते विरोधीपक्षांवर बिनबुडाचे आरोप करित आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous articleएकाच दिवसात ३१४ हाॅटेलवर कारवाई !
Next articleजिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयांवर भुजबळ समर्थकांची उद्या निदर्शने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here