भुजबळांवर अन्याय करणा-यांना जनता कधीच माफ करणार नाही

भुजबळांवर अन्याय करणा-यांना जनता कधीच माफ करणार नाही

खा. सुप्रिया सुळे

नाशिक ( येवला ) : छगन भुजबळांवर झालेला अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही.ज्यांनी भुजबळांवर अन्याय केला आहे त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही. भुजबळ बाहेर पडल्यावर या सरकारला सळो की पळो करुन सोडतीलच आणि यांची सत्ता घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी येवल्याच्या जाहीर सभेमध्ये व्यक्त केला.

नाशिक जिल्हयाने नेहमीच शरद पवारांवर खूप प्रेम केले आहे. शिवाय चांगली साथही दिली आहे अशी कबुली त्यांनी यावेळी दिली. या सभेला अजितदादा का आले नाहीत याबाबत सांगतानाच त्यांनी भुजबळांच्या काही आठवणी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा सत्तेत आली त्यावेळी पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा मान भुजबळांना मिळाला होता. येवला हे माझे एक प्रकारचे माहेरच आहे. कारण भुजबळ यांनो मला आपली मुलगीच मानली होती.भुजबळांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. सरकारला आम्ही विनंती करतोय की, स्वाभिमानी माणसाला बाहेर काढा. मात्र आम्हांला विश्वास आहे की, २०१९ च्या निवडणूकांच्या सभांना छगन भुजबळ असतील हे मी ठामपणे सांगते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Previous articleनाकर्त्या सरकारमुळे मंत्रालयात आत्महत्येचा काऊंटडाऊन सुरु 
Next article“यमका” साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here