गारपीटीमुळे १९ जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित

गारपीटीमुळे १९ जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित

१०२ तालुक्यांमधील ३ हजार ७२४ गावांचा समावेश
मुंबई  : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १९ जिल्ह्यातील सुमारे १०२ तालुक्यांमधील ३ हजार ७२४ गावांमधील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यातील ५१० गावामधील सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ बुलढाणा ३३० गावे, ४१ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरचा समावेश आहे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे सुरु आहेत. बाधित १९ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, नांदेड, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला,वाशिम, चंद्रपूर, गोंदीया, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.
नुकसानाची जिल्हा, तालुका, गावनिहाय माहिती अशी (कंसात बाधीत हेक्टरची संख्या): बीड- माजलगाव, गेवराई, शिरुर- ४२ गावे (१० हजार ६३२), जालना- जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड- १७५ (३२ हजार), परभणी- सेलू व जिंतूर- २३- (8८हजार ५७९), जळगाव- जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर- ३८ (२ हजार ४९५) बुलढाणा- चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा- ३३० (४० हजार ३८५) अमरावती- मोर्शी,वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा- ५१० (४५ हजार ८६८), अकोला-मुर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार- १०१ (४ हजार ३६०) वाशिम- रिसोड व मालेगाव – ३११ (२६ हजार २८७),लातूर – लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा, शि.अनंतपाळ- ३०८ (१६ हजार ३६१) उस्मानाबाद- उमरगा व उस्मानाबाद- १२२ (३० हजार ११२), हिंगोली- सेनगाव व औढा-३९ (१ हजार ३९३), नांदेड- नायगाव, बिलोली, माहूर, किनवट, हदगाव, हि.नगर, धर्माबाद- ३२७ (२९ हजार ५३५), यवतमाळ- १० तालुके- २७६ (१३ हजार २६८), चंद्रपूर- वरोरा, भद्रावती, राजुरा- ५२ (२ हजार८५५), गोंदीया- देवरी, गोंदीया, सडक अर्जनी, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोर, आमगाव, सालकेसा-३५१ (४ हजार ३३१), वर्धा- देवळी, हिंगणघाट, आर्वी, सेलू, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, वर्धा- ३०६ (५हजार८००), नागपूर-कामठी, सावनेर, काटोला, नरखेड, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरखेड-३७४ (१४ हजार ५५९), भंडारा-मोहाडी तुमसर-३२ (१ हजार ५५४), गडचिरोली- कोरची-७ (२१). एकूण ३ हजार ७२४ गावातील २ लाख ९० हजार ३९५  हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजुनही पंचनामे सुरू आहेत. बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleधोम , कण्हेर प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी देणार
Next articleभाजप नेत्यांनी “त्या छिदमचा” निषेधही केला नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here