नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी सरासरी ७२.२१ टक्के मतदान

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी सरासरी ७२.२१ टक्के मतदान

मुंबई : कणकवली (जि. सिंधुदुर्ग) व आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत; तसेच जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी ७२.२१ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने ५ मार्च २०१८ रोजी ६ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता; परंतु न्यायालयीन निकालाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात बदल करण्यात आला होता. त्यानुसार गुहागर व देवरूख नगरपंचायतींसाठी १२ एप्रिल २०१८ रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र. १० मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी; तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ७ मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी ११ एप्रिल २०१८ रोजी मतदान होईल. उर्वरीत ठिकाणी आज मतदान झाले; तसेच इतर विविध ठिकाणच्या ७ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी १२ एप्रिल २०१८ रोजी होणार आहे. नगरपरिषद,नगरपंचायतनिहाय झालेले सरासरी मतदान असे: कणकवली- ७६.९७, आजरा- ८२.११, जामनेर- ७०.९२ आणि वैजापूर- ६८.७९. एकूण-

नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी झालेले सरासरी मतदान (कंसात प्रभाग क्र): रत्नागिरी (३ब)- ५७.२१, आळंदी (१अ)- ६५.५३, तासगाव (६अ)- ५९.७०, दुधनी (४ब)- ७०.६१, सावदा (3ब)- ६५.१७, कुंडलवाडी (५ब)- ७३.६९ व कळंब (४)- ८०.५४. एकूण- ६४.५७.

Previous articleचंद्रकांत दादांनी स्वतःच्या १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करून ठेवावी
Next articleखबरदार.. पवार साहेबांवर केलेली टिका खपवून घेणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here