चार सनदी आधिका-यांच्या बदल्या

चार सनदी आधिका-यांच्या बदल्या

मुंबई  : दोनच दिवसापूर्वी तब्बल २८ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर आज राज्य सरकारने चार वरिष्ठ सनदी  अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल चव्हाण यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येवून सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने  आज चार सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. श्रीमती सिमा व्यास यांना हाफकीनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली करून महिला आणि बाल कल्याण आयोगाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर संपदा मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंद्रा माल्लो याची नियुक्ती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून बाल विकास योजनेत आयुक्त पदावर करण्यात आली आहे.सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची नियुक्ती औरंगाबाद येथील जिल्हाधिकारीपदावर करण्यात आली आहे.ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल चव्हाण यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारीपदी करण्यात आलेी नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

 

Previous articleबीड जिल्ह्यातील साडे चार हजार कोटीच्या राष्ट्रीय महामार्गाचे उद्या भूमीपूजन
Next articleखडसे आणि इनामदार यांची नार्को चाचणी करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here