सुप्रियाताईंच्या ट्विटमुळे माझा राजकीय भाव वाढला
आ. प्रसाद लाड
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटकरून भाजपला लक्ष केले आहे मानव तस्करी करुनही फक्त भाजपात आहेत म्हणून आमदार प्रसाद लाड पावन झाले का’ असा सवाल त्यांनी करून आ.लाड आणि मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे. तर या ट्विटमुळे माझा राजकीय भाव वाढला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आ. प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीमध्ये असल्यापासून मी व्यवसायात आहे.भाजपमध्ये आलो त्यावेळी आणि यापूर्वी मी ज्या व्यवसायात होतो त्याच व्यवसायात आहे. सुप्रियाताईंनी टीका करण्यापूर्वी याची खातरजमा करायला हवी होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मला नेहमी सांगायचे की, आरोप झाले की तो माणूस मोठा होतो. त्यामुळे सुप्रियाताई यांनी आज केलेल्या ट्विटमुळे माझा राजकीय भाव वाढला असून, राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहे.