औरंगाबाद घटनेची न्यायालयीन चौकशी करा

औरंगाबाद घटनेची न्यायालयीन चौकशी करा

धनंजय मुंडे यांची मागणी

BY-mumbai Nagri-12 may

मुंबई : औरंगाबादच्या जनतेने शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करतानाच या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

औरंगाबाद घटनेवर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,काही मोहिमा राबवताना,नाजूक, वादग्रस्त विषय हाताळताना प्रशासनाने , पोलिसांना काळजी घ्यायला हवी, स्थानिक लोकांना विश्वासात घेतले पाहिजे.राज्यात मागील काही काळात सातत्याने अशा घटना घडत असतांना सरकारचा गुप्तचर यंत्रणा काय करत आहे असा सवाल करून हे गुप्तचर खात्याचे अपयश आहे असा आरोप मुंडे यांनी केला.येथिल घटनेत दोन व्यक्तींचा जीव जातो, अनेक लोक जखमी होतात ही गंभीर बाब असल्याने या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मुंडे यांनी केली.

Previous articleपंकजा मुंडे यांच्यामुळे बीड जिल्हयाला बोंडअळी नुकसानीचे २५६ कोटी मंजूर
Next article…हा तर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बळी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here