भाजपकडून प्रत्येक बुथवर पगारावर लोकांची नियुक्ती

भाजपकडून प्रत्येक बुथवर पगारावर लोकांची नियुक्ती

खा. अशोक चव्हाण

मुंबई :  काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक बूथवर भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन, दादर येथे बुथ कमिट्यांच्या विधानसभा समन्वयकांची बैठक पार पडली. सदर बैठकीला राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघाचे बुथ कमिटी समन्वयक उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटींच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी बुथ समन्वयकांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, देशभर भाजपा सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणूक यंत्रणा उभारून प्रत्येक ठिकाणी साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत आहे.  प्रत्येक बुथवर भाजपने पगारावर लोकांची नियुक्ती केली आहे.  प्रशासन आणि यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करून निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही लढाई निकराने लढावी लागणार आहे. ही लढाई केवळ काँग्रेस पक्षाकरिता नसून देशाची लोकशाही संविधान आणि देश वाचविण्यासाठी आहे. काँग्रेसच्या लोकशाही विचारांचे समर्पित किमान १० कार्यकर्ते प्रत्येक बुथवर नेमण्याची प्रक्रिया सुरु असून ती लवकरच पूर्णत्वास जाईल असे खा. चव्हाण म्हणाले.

Previous articleपेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत!
Next articleशस्त्रांची विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला: विखे पाटील