१९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही

१९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही

शरद पवार यांचे भाकित

मुंबई : देशामध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर १९७७ ला सर्वच विरोधी पक्ष एकत्र आल्याने इंदिरा गांधीचे सरकार कोसळले होते. सध्या देशात १९७७ सारखीच परिस्थिती असून, सर्व विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली असल्याने १९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही असे भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे.

सध्या केंद्रात असणारे सरकार एकखांबी नेतृत्व चालतवत आहे अशी टीका करतानाच, १९७७ मध्ये ज्याप्रमाणे विरोधकांनी एकजूट करून त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना खाली खेचले होते तसेच आज सर्वच विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली असल्याने १९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही असे पवार म्हणाले. देशात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला असल्याने सध्या असणारे जनमत लक्षात घेत समविचारी पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले.

Previous articleभाजपाध्यक्ष अमित शहा “मातोश्री”वर !
Next articleशरद पवारांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मिळत नाही