मातोश्रीवर शहा-उध्दव भेटीत शिवसेनेची किंमत किती ठरली
नवाब मलिक यांची टीका
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्री भेटीमध्ये शिवसेनेची किंमत ठरली का याचे उत्तर महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेला हवे आहे .तशी माहिती भाजप-सेनेने जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या मुंबई भेटीत उद्योजक रतन टाटा,माधुरी दिक्षित यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी पक्षाने चार वर्षात काय काम केले याची माहिती दिली. मुळात सरकारने शेतकरी,शेतमजुर कामगार यांच्याकडे लोखाजोखा सादर न करता ज्यांनी पक्षासाठी काम केले आहे त्यांच्याच भेटी ते घेत आहेत. आज तुम्ही लाखभर लोकांना भेटा परंतु ही करोडो जनता तुम्हाला बाहेरच फेकणार आहे असा टोलाही मलिक यांनी लगावला. गेली साडे तीन वर्ष आम्हाला किंमत देत नाही असी ओरड शिवसेनेनकडून केली जात असताना मग आत्ता शहा आणि उध्दव ठाकरे यांच्या दिड तासाच्या भेटीमध्ये शिवसेनेची किंमत ठरली का असा आरोपही मलिक यांनी केला.
.