नागपूरातील पावसाळी अधिवेशन बालहट्टापायी: अजित पवार
पुणे : नागपूर येथे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन हे कुणाच्या तरी बालहट्टामुळे घेतले गेल्याने या हट्टापायी अधिवेशानाचा पहिला आठवडा पाण्यात गेला अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज येथे केला आहे.
विधानभवन परिसरातील ड्रेनेजमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या हाच धागा पकडत, हे काय चालले असा सवालही पवार यांनी केला. केंद्र सरकारने दीडपट हमी भाव जाहीर करणे म्हणजे मध्यावधी निवडणुका लागू शकतात अशी शक्यता पवार यांनी व्यक्त केली. नागपूर मध्ये सुरू असलेले पावसाळी अधिवेशन हे मुहूर्त बघून सोमवार ऐवजी बुधवारपासून सुरु केले आहे.केंद्रीयमंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरातील असताना ही अवस्था झाली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.