अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही !
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा मराठा मोर्चाच्या वतीने आज येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला.
परळी येथे सुरू असलेल्या सकल मराठा आंदोलकांनी येत्या ९ ऑगस्टला राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी आज विक्रोळी पार्कसाईट येथे बैठक पार पडली. मराठा समाजाच्या
आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन होऊ देणार नसल्याचा असा निर्धार आजच्या बैठकीत केला. आज झालेल्या बैठकीतील निर्णय राज्य समन्वयकांपर्यंत कळविण्यात येणार असून, येत्या ९ ऑगस्ट रोजी होणारे राज्यव्यापी आंदोलन हे लोकशाही मार्गाने आणि शांततेत करण्याचे आवाहनही आजच्या बैठकीत करण्यात आले.