उध्दव ठाकरे यांनी अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही : अरफात शेख

उध्दव ठाकरे यांनी अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही : अरफात शेख

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अरफात शेख यांचा भाजपात प्रवेश

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रेम दिले मात्र अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही असा आरोप दोनच दिवसापूर्वी अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले हाजी अरफात शेख यांनी केला आहे. वाहतूक सेनेचे अध्यक्ष आणि उपनेते हाजी अरफात शेख यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेनेचे उपनेते, वाहतूक सेनेचे अध्यक्ष महाराष्ट्र आणि दोनच दिवसापूर्वी राज्य अल्पसंख्याक आयोगाचाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेले हाजी अरफात शेख यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे़.काल वर्षा निवास्थानी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आ.आशिष शेलार उपस्थित होते. हाजी अरफात शेख यांच्या भाजप प्रवेशाने शिवसेनेला मोठ्ठा धक्का बसला आहे.

काल मुख्यमंत्री फडणवीस भेट घेवून भाजपमध्ये प्रवेश केलेले हाजी अरफात शेख येत्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करून जाहीर प्रवेश करणार आहेत.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केवळ प्रेम दिले असे सांगत त्यांनी अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला अशी भावना शेख यांनी व्यक्त केली.

मनसेला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश देताना मला उपनेते पद दिले.मात्र विधानपरिषदेचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात तशी संधी दिली नाही.अल्पसंख्याक आयोगामध्ये देखील आपल्याला संधी डावलण्यात आली.वाहतूक सेनेची पूर्ण जबाबदारी देण्याचे जाहीर करूनही त्याची कार्यवाही केली नाही असा अशी टीका हाजी अरफात शेख यांनी करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अध्यक्षपदाची संधी देवून अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असे शेख म्हणाले.

वाहतूक सेनेचे अध्यक्ष असताना हाजी अराफात शेख यांनी पक्षात अन्याय करण्यात येत असल्याची आणि वेगळी वागणूक दिली जाते असा थेट आरोप शिवसेनेच्या व्यासपीठावरून करून खळबळ उडवून दिली होती.शेख यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Previous articleजनतेतील प्रचंड असंतोषामुळे मुख्यमंत्री राज्यात फिरू शकत नाहीत
Next articleश्री कुलस्वामी सहकारी पतपेढीने  पुढाकार घेऊन तरुणांना व्यवसाय उभे करण्यास मदत करावी