भाजपाचा बेटी भगाव असा नारा आहे का? : उध्दव ठाकरे
मुंबई : भाजपाचे आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाई करावी अशी मागणी करतानाच त्यांना इतर कोणत्याही पक्षांनी उमेदवारी देवू नये असे मत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे असून,भाजपाचा बेटी भगाव असा नारा आहे का? असा खरमरीत सवालही त्यांनी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य करणा-या आ. राम कदम यांच्या विधानाचा समाचार घेतला. माता भगिनींचा अपमान करणाऱ्या राम कदम यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम ही हिनवृत्तीची माणसे आहेत.भाजपाचा बेटी भगाव असा नारा आहे का असा सवाल करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धाडस दाखवून राम कदमांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी करून त्यांना इतर पक्षांनीही उमेदवारी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.आ. कदम किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम असो हे तिघेही एकाच माळेचे मणी असून त्यांना माफी म्हणजे वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे, असे ते म्हणाले.