साडेचार वर्षांच्या भाजपच्या राजवटीत भारत आयसीयूत :राज ठाकरे

साडेचार वर्षांच्या भाजपच्या राजवटीत भारत आयसीयूत :राज ठाकरे

मुंबई: भाजपच्या राजवटीत भारतावर खूप अत्याचार झाले असून तो आयसीयू मध्ये गेला असल्याची बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतरच तो आता शुद्घीवर येईल, असेही राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातुन टोला लगावला दिवाळीनिमित्त व्यगचित्रांची मालिका राज यांनी सुरु केली असून धनत्रयोदशीनिमित्त पहिले व्यंगचित्र जारी केले आहे.

वैद्यकीय शास्त्राचा गुरु धन्वंतरी याचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो, असे सांगत राज यांनी भाजपवर निशाणा साधणारे व्यंगचित्र काढले आहे. त्यात भारताला आयसीयू मध्ये दाखल केलेले दाखवले असून धन्वंतरी लोकांना असे सांगत आहेत की, काळजीचे कारण नाही. साडेचार वर्षात त्याच्यावर खूप अत्याचार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरच तो शुद्घीवर येईल.

Previous articleवाघिणीने ठार केलेल्या महिलांचाही मला विचार करावा लागतो : मुनगंटीवार
Next articleअवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी करणार : मुख्यमंत्री