सरकारला कधी जाग येणार? : सुप्रिया सुळे
बारामती: जेजुरी आणि मोरगाव या प्रमुख धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती भाविकांनी वारंवार मागणी करुनही केली गेली नाही. याबाबत आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. थेट मुख्यमंत्र्यानाच त्यांनी आव्हान दिले असून सरकारला कधी जाग येणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
जेजुरी आणि मोरगाव ही राज्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळे आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी चांगले रस्ते नाहीत.सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करुन रस्त्यांची अवस्था दाखवली. लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढले आहे. या रस्त्यावर कालच दोन अपघात झाले. जखमी रुग्णालयात आहेत. त्यांना उपचार मिळावेत आणि रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी मी सरकार दरबारी करत आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.