कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागं करणार : उध्दव ठाकरे

कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागं करणार : उध्दव ठाकरे

मुंबई :  कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागं करणार आहोत असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरेंनी यांनी दिला असून, कुंभकर्णा जागा हो अशी यापुढे आमची  भूमिका राहिल असेही त्यांनी शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आज शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिका-यांची बैठक पार पडली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.राज्यात दुष्काळाचे फक्त सावट नाही तर दुष्काळ झपाट्याने पसरत असून, अशा परिस्थितीत कोणत्या विभागाने कोणती कामे करायला पाहिजे याचा आज झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.  कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागं करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. कुंभकर्णा जागा हो अशीच आमची यापुढील भूमिका असणार आहे असेही ते म्हणाले.

दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला जाग आणण्यासाठी येत्या २४ तारखेला  पंढरपूरमध्ये सभा घेणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहिर केले.दुष्काळ परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा वेळी शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांना आधार देत आली आहे असेही ठाकरे म्हणाले.

निवडणुका जवळ आल्या की राम मंदिर बांधण्याची घोषणा केली जाते. मात्र मंदिर काही उभारले जात नाही, त्यामुळेच शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला असल्याचे सांगतानाच, केंद्रात  मजबूत सरकार सत्तेवर आहे. तरीही राम मंदिराचा प्रश्न का सोडवला जात नाही असाही सवालही त्यांनी उपस्थित केला.

Previous articleराज्यातील युती सरकार हे सर्वात मोठे विघ्न : चव्हाण
Next articleराज्य भारनियमन मुक्तच ; शेतकऱ्यांना ८ तास वीज देणार : पाठक