अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अपघातातून बालंबाल बचावले

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अपघातातून बालंबाल बचावले

अमरावती: कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या बसला होणारा अपघात सुदैवाने टळला. या बसमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेते प्रवास करत होते. ते सर्वच जण थोडक्यात बचावले.

जनसंघर्ष यात्रेची बस मोर्शीहून निघाली. नंतर ती खानापूरमध्ये दोन वेळेस थांबली. पुढे निघाल्यावर गावाच्या वेशीवर एक डंपर समोर आला. रस्त्याचे काम येथे सुरू होते. त्यामुळे पुढची वाट अतिशय अरूंद होती. तरीही वाहतूक सुरू होती. बस आणि डंपर एकाच वेळेस जाणे शक्य नव्हते. डंपर चालकाने प्रसंगावधान राखत डंपर डाव्या बाजूला घेतल्याने अपघात टळला. बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने कॉंग्रेस नेते सुखरूप राहिले. डंपर अचानक डाव्या बाजूला घेतल्याने तो कलंडला पण उलटला नाही.

यानंतर जनसंघर्ष यात्रेची बस पुढे नीट प्रवास करत निघाली. मात्र संभाव्य अपघाताचे वृत्त समजताच अशोक।चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना कार्यकर्त्यांनी सतत फोन सुरू होते.तत्पूर्वी मोर्शी येथील अशोक चव्हाण यांच्या सभेला मोठा जनसमुदाय जमला होता. चव्हाण यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

Previous articleअमित शहांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा : शरद पवार
Next articleशेतकरी कंपन्यांना एमआयडीसीमध्ये मिळणार जागा :  सुभाष देसाई