भाजप-सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार : अजित पवार

भाजप-सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार : अजित पवार


रायगड:ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाचं ब्रॅडींग करुन भाजपाने सत्ता मिळवली.लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणावयाचे आहे म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचे सांगतानाच जातीयविरोधी कामगारविरोधी सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे त्याला साथ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महाडच्या जाहीर सभेत केले.

महाडच्या जाहीर सभेत अजित पवार यांनी केंद्र आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पवारांनी आपल्या भाषणामध्ये भाजप सरकारवर जोरदार आसूडही ओढले. जोपर्यंत केंद्रातील आणि राज्यातील सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही असे आदेशच कार्यकर्त्यांना दिले.अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आरक्षणाचा मुद्दा काढला. आरक्षण दयायचं होतं…दानत होती तर गरीबांना दयायचं होतं असा सवाल करतानाच इन्कमटॅक्स भरणाऱ्याला आरक्षण आणि ज्याची एकवेळ चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असा आरोपही अजित पवार यांनी केला.

Previous articleकॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही: मेटे
Next articleदेशात सत्ता परिवर्तनाचे वारे: विखे पाटील