राज्यात १०१ उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

राज्यात १०१ उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात ६३ मतदारसंघात १०१ उमेदवारांनी १२६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

यामध्ये जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात २ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा- एका मतदारसंघात २ उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात २ उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात ५ उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, भंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, गोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवार, चंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवार, यवतमाळ- २ मतदारसंघात ३ उमेदवार, नांदेड- ५ मतदारसंघात १५ उमेदवार, हिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवार, परभणी- २ मतदारसंघात ६ उमेदवार, जालना- एका मतदारसंघात २ उमेदवार, औरंगाबाद- ४ मतदारसंघात ८ उमेदवार, नाशिक- ३ मतदारसंघात ३ उमेदवार, पालघर- एका मतदारसंघात एक उमेदवार, ठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवार, रायगड- एका मतदारसंघात ५ उमेदवार, पुणे- ७ मतदारसंघात ८ उमेदवार, अहमदनगर- ५ मतदारसंघात ९ उमेदवार, बीड- ४ मतदारसंघात ९ उमेदवार, लातूर- ३ मतदारसंघात ३उमेदवार, उस्मानाबाद- एका मतदारसंघात एक उमेदवार, सोलापूर- २ मतदारसंघात २ उमेदवार, सातारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, कोल्हापूर- ३ मतदारसंघात ३ उमेदवार आणि सांगली जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

Previous articleमहायुतीची घोषणा ; बंडाळी टाळण्यासाठी जागा वाटप गुलदस्त्यात
Next articleभाजपाची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; कोथरुडमधून चंद्रकांत पाटील