संघात गाढव आले तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो

संघात गाढव आले तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो

भुसावळ दि. २३ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत एखादे गाढव जरी आला, तरी तो बाहेर पडताना माणूस म्हणून पडतो, असे वक्तव्य माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे ते भुसावळमध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, भाजपच्या स्थापनेत संघाचे मोठे योगदान आहे. राज्यासह देशभरात ज्या ज्या ठिकाणी संघाच्या शाखा आहेत. अशा ठिकाणी भाजपाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणिवर इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश दिला जात आहे सुरु यावर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. या सोहळ्याला खडसे याःच्यासह , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.  नेता घडल्याने पक्ष वाढतो, त्यामुळे माझ्यामुळे पक्ष वाढला ही धारणाच चुकीची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक अडचणींच्या काळात माडे यांनी आपल्याला केलेले मार्गदर्शन हे आपल्या जीवनात अतिशय मोलाचे ठरले आहे.” असे खडसे यांनी म्हटले.

Previous articleकर्जमाफीला अजून १५ दिवसाचा कालावधी लागणार
Next articleचंद्रकांत पाटील विनोद तावडे उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी “मातोश्रीवर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here