मुख्यमंत्र्यांना ‘भय्याभूषण’ पुरस्कार द्या
संदीप देशपांडे यांची टीका
मुंबई दि.३० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही,मात्र त्यांना ‘भय्याभूषण’ पुरस्कार द्यावा अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातील लोकांनी मुंबईच्या वैभवात भर घातली आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घाटकोपर मधिल कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यावरून मनसेने मुख्यमंत्र्यावर तोफ डागली आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत संदीप देशपांडे यांनी ही टीका केली आहे. गुजरात राज्यात निवडणूका असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा कोणत्याही भाषेचा नसावा असेही देशपांडे म्हणाले.