शिवसेनेचे गुजरातच्या शेतक-यांना “कर्जमाफीचे” वचन

शिवसेनेचे गुजरातच्या शेतक-यांना “कर्जमाफीचे” वचन

मुंबई :     शिवसेनेने गुजरात निवडणूकीसाठी आपला वचननामा जाहीर केला असून, शेतक-यांना कर्जमाफी देण्याबरोबरच, शेतीमालाला योग्य भाव, तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आणि आर्थिक दुर्लबांना आरक्षण देण्याचे आश्वासन आपल्या वचननाम्यात दिले आहे.

गुजरातच्या निवडणूकीसाठी शिवसेनेने आपला वचननामा आज जाहीर केला आहे.भाजपने कधी हिंदुत्व तर कधी सेक्युलरची भूमिका घेतल्याने गुजरातच्या जनतेमध्ये तिसस्काराची भावना निर्माण झाल्याचे चित्र असल्याची टीका करण्याच येवून शिवसेना सत्तेत आल्यास गुजरात मधिल शेतक-यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव ,वीज जोडणी, तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार, गुजरातच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी योजना, महिला गोरगरीबांसाठी योजना, नर्मदा योजना पूर्णत्वास नेणे. शेतक-यांना शेतीसाठी मुबलक पाणी पुरवठा, सामाजातील आर्थिक दुर्लबांना आरक्षण देण्याबरोबरच, वस्तु व सेवा करामध्ये कपात करण्याचे वचन या वचननाम्यात देण्यात आले आहे. शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई यांनी हा वचननामा जाहीर केला.यावेळी गुजरातच्या संपर्क प्रमुख राजुल पटेल, संघटक हेमराज शहा आणि गोध्राचे माजी आमदार हरेश भट्ट यावेळी उपस्थित होते.

Previous articleजिल्हा परिषदेच्या ४ हजार ३५३ शाळेत शून्य ते १० पटसंख्या
Next article…तर फडणवीस यांनाही लोक चोरांचे मुख्यमंत्री म्हणतील 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here