नितीन आगे प्रकरणी आरपीआय ( खरात ) ची मंत्रालयावर धडक
मुंबई : खर्डा येथिल नितीन आगे या दलित युवकाच्या हत्ये प्रकरणातील १३ साक्षीदार फितुर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आरपीआय खरात गटाने आज मंत्रालयाच्या गेट समोर धरणे आंदोलन केले.