जेष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

जेष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई :  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०१७ चा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना जाहीर करण्यात आला. तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सुहास सरदेशमुख, सरिता कौशिक, संदीप आशर यांना जाहिर झाल्याची घोषणा वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह विवेक भावसार यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून केली.

उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता प्राप्त झालेली नामांकने आणि शिफारशीतून वृत्तपत्र प्रतिनिधीसाठी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सुहास सरदेशमुख (लोकसत्ता, औरंगाबाद) यांची तर इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीतून सरिता कौशिक (एबीपी.माझा, नागपूर) यांची निवड करण्यात आली. वार्ताहर संघ सदस्यांतून संदीप आशर (इंडियन एक्स्प्रेस, मुंबई) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून अभिनंदन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत राजभवन येथे येत्या १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.पुरस्कार निवड समितीवर सुरेंद्र गांगण, विजय सिंह, अनिकेत जोशी यांनी काम पाहिले, अशी माहिती संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी दिली.

Previous articleभिमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
Next articleकायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही ;भीमा कोरेगाव येथील हल्लखोरांना अटक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here